Diwali Lantern

हिमायतनगर तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग.. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते गुडघ्याला बासिंग बांधून बसलेले पाहायला मिळत आहे.

( _मुख्य संपादक :- शंकर बरडे_)_

हिमायतनगर : तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापू लागले आहे. एक नगरपंचायत, दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. गावोगावी उमेदवारांच्या चर्चांना उधाण आले असून, “तिकीट कोणाला मिळणार.?कोणाची फिल्डिंग कशी चालली.?”, कोण निवडून येईल.?कोणता पक्ष कोणती राजकीय खेळी खेळणार.?

या प्रश्नांवर गावातील राजकारणात सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. वाड्यावर-वस्तीवर, पारावर, चौकाचौकात राजकारणाच्याच चर्चा सुरू असून, गावागावात निवडणुकीची चाहूल लागली आहे.

पक्षांतर्गत तणाव आणि गटबाजीचे राजकारण पुन्हा डोकावू लागले आहे. काही ठिकाणी जुन्या गटांमध्ये समेटाचे प्रयत्न सुरू असून, काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्याचा विचार पक्षांतर्गत सुरू आहे. तर अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये “मात किंवा घात” अशी चुरस दिसून येते आहे.दरम्यान, काँग्रेस, भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष आदी पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. काही ठिकाणी पक्षांनी अंतर्गत सर्वेक्षणास सुरुवात केली असून, ग्राउंड लेव्हल सर्व्हे, कॉर्नर बैठका, आणि गुप्त चर्चा यांना जोर आला आहे.आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या असल्या तरी,पुढच्या टप्प्यात तरी संधी मिळेल.? या भाबड्या आशेवर कार्यकर्त्यांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत, तर काही ठिकाणी नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निवडणुकीच्या रणशिंगाच्या तयारीत हिमायत्तनगर तालुका सज्ज झाला आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारांच्या घोषणा आणि गटबाजीतील बदल पाहायला मिळणार असून, राजकीय समीकरणांचे नवे चित्र उभे राहील अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे. सद्या तरी कोणत्याही पक्षांनी युतीची भूमिका अधिकृतरित्या स्पष्ट केलेली नाही, निवडणुका या स्वबळावर होणार का युतीमध्ये होणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल, पण पडद्यामागे सर्व ठरले असल्याची कुजबूज सुरू आहे परंतु तोवर मात्र इच्छुक उमेदवारांची मनात घालमेल सुरू आहे हे मात्र तितकेच खरे… सोशल मीडियात मात्र “भावी” च्या बॅनरबाजीने नुसता धुमाकूळ घातला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *